पोस्ट्स

पुन्हा भेटूया .. ⏳

इमेज
   लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर ' भवानी ट्रॅव्हलर ' कोकणच्या दिशेने सुसाट धावत होती . अजय - विजय , ड्रायव्हर - क्लिनरची जोडी २५ प्रवाशांनी भरलेली बस घेऊन गावाकडे निघाले होते . डिसेंबर महिना सुरु झाला होता . थंडीचे दिवस आणि मुलांना सुट्ट्या , त्यामुळे त्यांची ट्रॅव्हलर रोज नवीन - नवीन ठिकाणी जात होती . गेले १५ दिवस , ते दोघेही सतत फिरतीवर होते . आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते मुंबईत पोहचले . थोडावेळ विश्रांती आणि जेवणखाण आटोपून बरोबर दोन वाजता कोकणला जाण्यासाठी त्यांनी ट्रॅव्हलर सुरु केली . साधारण ७ तासांचा प्रवास आहे , आपण नऊ वाजेपर्यंत कोकणात पोहचू , बस दोनदा थांबेल , चहा - पाणी व फ्रेश होण्यासाठी , विजय क्लिनर बसमधील प्रवाश्यांना सांगत होता . ' गणपती बाप्पा मोरया ' अशी प्रार्थना करून बस बरोबर सव्वा दोनला निघाली . प्रवासी जेवण करून निघालेले होते त्यामुळे थोड्यावेळात ते पेंगू लागले . बसमध्ये शांतता पसरली . जवळपास सहावाजेपर्यंत प्रवासी झोपलेले होते . सहा वाजता क्लिनरने आवाज दिला , येथे बस २० मिनिटे थांबणार आहे . हे ऐकताच प्रवासी उठले , बसमधून बाहेर आले . बस एका हॉटेलजव...

ही .... पटलेली हाय!

इमेज
  लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर           शिरपूर गाव , कोकणात वसलेलं , तसं लहानसं खेडं , पाचशे - सहाशे वस्तीचं , गणपत व भीमाबाई पाटील हे जोडपे आजारपणात मरण पावले . त्यांचा एकुलता एक मुलगा शिरीष , तेव्हा चार वर्षांचा होता . हे जोडपे अतिशय प्रेमळ , कष्टाळू आणि सहकार्य करणारे असे होते . त्यामुळे गावातील माणसांनी शिरीषचा सांभाळ प्रेमाने , मायेने केला . हा , हा म्हणता वर्षे सरली आणि तो २१ वर्षांचा उमदा तरुण झाला . ऐन तारुण्यात जशी मुला - मुलींना प्रेमाची भुरळ पडते , तसे त्यालाही प्रेमाचे वारे लागले . पण ... ना घर , ना शेती , ना धड नोकरी , मग मुलीला मनातील भावना कशा सांगणार ? त्याने शहरात जाऊन नशीब आजमावयाचे ठरवले आणि लवकरच तो गावकऱ्यांचा निरोप घेऊन शहराकडे निघाला . गावातील वयस्कर व अनुभवी व्यक्ती नाना पाटील , यांनी शिरीषच्या हातावर पैसे ठेवले , तो त्यांना नमस्कार करीत म्हणाला ," नाना हे पैसे व्याजासकट द्यायला मी गावात पुन्हा येईन ."   त्याला निरोप दिला आणि गावाचा दिनक्रम पुन्हा सुरु झाला .          माझं पोरगं अ...