पोस्ट्स

Golden Journey

इमेज
  लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर      ' स्वप्न निवास ' बंगला आज फुलांच्या माळांनी नटलेला होता, दिव्यांची रोषणाई केली होती, गेटजवळ केळीचे खांब डौलाने उभे होते आणि बॅंडवाले देखील तयार होते. पाहुण्यांना बसण्यासाठी बाहेर हिरवळीवर खुर्च्यांची व्यवस्था केली होती. बंगल्याच्या आत मंद आवाजात सनई चौघडा वाजत होता. पाहुणे मंडळीं यायला सुरवात झाली. घरात नातेवाईकांची गडबड सुरु होती, मंगलमय वातावरण होते.    पटापट नाष्टा करा आणि तयार व्हा, सायली तिच्या मुलांना, सई आणि सुमितला सांगत होती. दुसऱ्या खोलीत सायलीची वहिनी स्मिता, सर्व सामान ताटात व्यवस्थित ठेवत होती पण तिची ६ वर्षाची मुलगी शार्वी सारखी तिच्या पाठीशी लागत होती. तिने तिच्या हातावर लाडू दिला व सांगितले की, सईताई आणि सुमितदादा यांच्याबरोबर खेळ जा, मला त्रास देऊ नको. तिने लाडू हातात घेत विचारले, "आई, लाडू का बनवला?" स्मिता हसत म्हणाली," आज आपल्याकडे गंमत आहे, जा पळ, असे म्हणून तिला पिटाळले."      अप्पा आणि आईंचे आवरले का? हे पाहण्यासाठी ती त्यांच्या खोलीकडे वळली. अहो, किती वेळ आरशात स्वतःला पहात...

चाळिशीतील वादळ 🙆‍♂️

इमेज
  लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर           सारखी चिडू नकोस गं , आई मला फोनवर उपदेश देत होती . मी तिला म्हणाले ," तुझ्याकाळी इतकी tensions नव्हती , महागाई नव्हती , शिक्षणात competition नव्हते , मी आणि दादा समंजस होतो त्यामुळे तुला कधी त्रास जाणवला नाही पण आताची मुले हट्टी आहेत , शिस्तबद्ध नाहीत , त्यांना पैशांची किंमत नाही ....           " अगं , किती बोलशील डोकं जरा शांत ठेव ," आई मला थांबवत म्हणाली .                  मला   ऑफिसमध्ये   काम   आहे ,  मी   फोन   ठेवते   असे   म्हणून   मी   कॉल   कट   केला   आणि   जागेवर   येऊन   बसली .  तेवढ्यात   शिपाई   आला   व   म्हणाला ,"  साहेबांनी   तुम्हांला   बोलावलंय ."  मी   लगेच   साहेबांच्या   केबिनमध्ये   गेली . " या   मॅडम   बसा ,  एक ...

पुन्हा भेटूया .. ⏳

इमेज
   लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर ' भवानी ट्रॅव्हलर ' कोकणच्या दिशेने सुसाट धावत होती . अजय - विजय , ड्रायव्हर - क्लिनरची जोडी २५ प्रवाशांनी भरलेली बस घेऊन गावाकडे निघाले होते . डिसेंबर महिना सुरु झाला होता . थंडीचे दिवस आणि मुलांना सुट्ट्या , त्यामुळे त्यांची ट्रॅव्हलर रोज नवीन - नवीन ठिकाणी जात होती . गेले १५ दिवस , ते दोघेही सतत फिरतीवर होते . आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते मुंबईत पोहचले . थोडावेळ विश्रांती आणि जेवणखाण आटोपून बरोबर दोन वाजता कोकणला जाण्यासाठी त्यांनी ट्रॅव्हलर सुरु केली . साधारण ७ तासांचा प्रवास आहे , आपण नऊ वाजेपर्यंत कोकणात पोहचू , बस दोनदा थांबेल , चहा - पाणी व फ्रेश होण्यासाठी , विजय क्लिनर बसमधील प्रवाश्यांना सांगत होता . ' गणपती बाप्पा मोरया ' अशी प्रार्थना करून बस बरोबर सव्वा दोनला निघाली . प्रवासी जेवण करून निघालेले होते त्यामुळे थोड्यावेळात ते पेंगू लागले . बसमध्ये शांतता पसरली . जवळपास सहावाजेपर्यंत प्रवासी झोपलेले होते . सहा वाजता क्लिनरने आवाज दिला , येथे बस २० मिनिटे थांबणार आहे . हे ऐकताच प्रवासी उठले , बसमधून बाहेर आले . बस एका हॉटेलजव...

ही .... पटलेली हाय!

इमेज
  लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर           शिरपूर गाव , कोकणात वसलेलं , तसं लहानसं खेडं , पाचशे - सहाशे वस्तीचं , गणपत व भीमाबाई पाटील हे जोडपे आजारपणात मरण पावले . त्यांचा एकुलता एक मुलगा शिरीष , तेव्हा चार वर्षाचा होता . हे जोडपे अतिशय प्रेमळ , कष्टाळू आणि सहकार्य करणारे असे होते . त्यामुळे गावातील माणसांनी शिरीषचा सांभाळ प्रेमाने , मायेने केला . हा , हा म्हणता वर्षे सरली आणि तो २१ वर्षांचा उमदा तरुण झाला . ऐन तारुण्यात जशी मुला - मुलींना प्रेमाची भुरळ पडते , तसे त्यालाही प्रेमाचे वारे लागले . पण ... ना घर , ना शेती , ना धड नोकरी , मग मुलीला मनातील भावना कशा सांगणार ? त्याने शहरात जाऊन नशीब आजमावयाचे ठरवले आणि लवकरच तो गावकऱ्यांचा निरोप घेऊन शहराकडे निघाला . गावातील वयस्कर व अनुभवी व्यक्ती नाना पाटील , यांनी शिरीषच्या हातावर पैसे ठेवले , तो त्यांना नमस्कार करीत म्हणाला ," नाना हे पैसे व्याजासकट द्यायला मी गावात पुन्हा येईन ."   त्याला निरोप दिला आणि गावाचा दिनक्रम पुन्हा सुरु झाला .          माझं पोरगं अज...